Recent Post

Popular Posts

तुरीच्या आयाती बाबत शासनाचा मोठा निर्णय, तूर भावाच काय होणार ? | Tur import duty update

तुरीच्या आयाती बाबत शासनाचा मोठा निर्णय, तूर भावाच काय होणार ?

tur dal import duty update

तूरीवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता संपूर्ण तूर डाळ बाहेरून आयात करण्यासाठी कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही, त्यामुळे डाळ स्वस्त होणार आहे.

तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा तर पिवळा वाटाणा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देणारा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून तूर आणि उडदाच्या आयात शुल्क माफीचा निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे तर वाटाण्याची आयात केली जात असताना त्याच्यावरती 30% आयातशुल्क आकारला जाणार आहे.

या संदर्भातील तीन महत्वाचाही राजपत्र केंद्र शासनाकडून २ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेली आहेत. या अधिसूचनेच्या माध्यमातून उडीद व तुरीच्या आयात शुल्क माफीच्या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अर्थात 31 मार्च 2027 पर्यंत उडीद तुरीचा आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेले आहे. पिवळा वाटाणा आयात केला जात असताना याच्यावरती 30% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे

देशभरामध्ये डाळीचे वाढणारे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळीचा पुरवठा निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु या निर्णयामुळे तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे. तुरीचे भाव वाढ होतील अशा प्रकारच्या वर्तवल्या जाणाऱ्या शक्यता आता कुठेतरी या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत.

तूर आणि उडीद हे दोन्ही शुल्कमुक्त श्रेणीत आहे त्याच्यामुळे 31 मार्च 2027 शुल्क आकारलं जाणार नाही आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 2028 29 पर्यंत तूर उडीद आणि मसूर या तिन्ही कडधान्याचे 100% हमीभावाने खरेदी करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे.


तूर डाळीच्या साठ्यासंदर्भात देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केली समिती

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानेआयातदारगिरणीमालकसाठेधारक आणि व्यापारी यांसारख्याकडे असलेल्या तूर डाळीच्या साठ्यावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारांच्या समन्वयाने अतिरिक्त सचिवनिधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. तूर डाळीची नियमित  स्वरूपात चांगल्या प्रमाणात आवक होत असून देखील बाजारपेठेशी संबंधित हा साठा खुला करत नसल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तूर डाळीच्या साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या घोषणेमागे  साठेबाज आणि बाजारातील सट्टेबाज यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा केंद्र सरकारचा हेतू स्पष्ट होतो. त्याचबरोबर आगामी काळात तूर डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्धार देखील यातून व्यक्त होत आहे. याशिवाय येणाऱ्या महिन्यांमध्ये इतर डाळींच्या  किंमतीमध्ये अवास्तव वाढ होऊ नये याउद्देशाने  देशांतर्गत बाजारपेठेत इतर डाळींच्या  साठ्यावर देखील केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.

केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये,  तूर डाळीचा साठा जाहीर करण्यासंदर्भात काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या  सूचनासर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना12 ऑगस्ट 2022 रोजी जारी केल्या आहेत. तसेच सुरळीत आणि सुविहित  आयातीसाठीसरकारने कमी विकसित देश  वगळता इतर देशांमधून होणाऱ्या तूर आयातीवर लागू होणारा 10 टक्के कर रद्द केला आहे.

कारण या शुल्कामुळे कमी विकसित देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या  शून्य शुल्क आयातीमध्ये देखील प्रक्रियात्मक अडथळे निर्माण होत होते.

NCMC Card - १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक

NCMC Card Rule 

मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी याचबरोबर डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात एनसीएमसी कार्ड ( NCMC Card ) आणण्यात आलेला आहे. 

यापूर्वी परिवहन विभागाच्या माध्यमातून हे कार्ड प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आलं होतं मात्र झालेल्या मोठ्या विरोधामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलेला होता, आणि अखेर आता राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या प्रवासासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला जेष्ठ नागरिक व अमृत जेष्ठ नागरिक यांनी एक ऑगस्ट 2026 पूर्वी एनसीएमसी कार्ड बनवावं अशा प्रकारचं आव्हान करण्यात आला आहे. 

राज्यात आज अखेरपर्यंत 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड साठी नोंदणी केलेली असून त्यापैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. उर्वरित नोंदणी करत लाभार्थ्यांचे कार्ड देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. 

राज्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी 4000 वरून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र कर्यान्वित करण्यात आलेली असून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना हे कार्ड सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी ही केंद्र सक्रियपणे काम करत आहेत.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने एनसीएमसी कार्डची प्रणाली राबवण्यात येत आहे.

राज्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणी करिता राज्य शासनाचा मोठा निर्णय | shetkari Karjmafi GR

राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी करता राज्य शासनाचा मोठा निर्णय 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

Shetkari Karjmafi GR

राज्यात शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपात्र शेतकऱ्यांचे याद्या प्रकाशित करण्यासह या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

11 जून 2026 रोजी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. 

GR Link 👇🏻 👇🏻 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 या योजनेच्या अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन पर अनुदान असे लाभ दिले जाणार आहेत. 


याचबरोबर थकबाकी कर्जाची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जून 2026 च्या जीआर नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. 

या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सदस्य असतील मुख्य कार्यकारी अधिकारी मध्यवर्ती सहकारी बँक, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा समन्वय व्यापारी बँका हे सदस्य असतील तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ही या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. 

या समितीच्या माध्यमातून महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे सदस्य पदाधिकारी याच प्रमाणे 25000 पक्षा जास्त पगार घेत असलेले कर्मचारी या सर्वांचे माहिती पोर्टल वरती अपलोड केली जाईल.


योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करणं त्याला प्रसिद्धी देणे, याचप्रमाणे आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांच्या याद्या प्रसिद्ध करणे त्याला प्रसिद्धी देणे, योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढणे त्याच प्रसिद्धी देणे इत्यादी काम या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत. 

शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करत असताना शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मेळाव्या आयोजित करणे कर्जमाफीच्या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी घेणं त्याचं निवारण करण आणि कर्जमाफी योजनेला जिल्हास्तरावरती प्रसिद्धी देणे अशा प्रकारच्या बाबी या समितीच्या माध्यमातून पार पाडल्या जाणार आहेत. 

एकंदरीत शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल शासनाच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे. 



गोदाम बांधकामासह तेल घाण्याला अनुदान; या योजनेसाठी अर्ज सुरू | NMEO 2026

गोदाम बांधकामासह तेल घाण्याला अनुदान; या योजनेसाठी अर्ज सुरू 

NMEO 2026 New Application Invited 

केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरामध्ये तेल निर्मितीमध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य ही योजना राबवली जात आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान या योजनेअंतर्गत क्लेकची फंड घटक चा अंतर्गत विविध बाबींसाठी अनुदान दिले जात आहे याच्याच अंतर्गत विविध घटकांकरिता 202627 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 

या योजनेअंतर्गत गोदाम बांधकाम तसेच काढणीपश्चात पायाभूत सुविधांमध्ये तेल घाणा मिनी ऑइल मिल व एक्सप्लेयर इत्यादी घटकांसाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना लाभ दिला जाणार आहे. 


राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्याला तेल घाण्याकरता कमीत कमी एक तर गोदाम बांधकामासाठी जास्तीत जास्त तीन लक्षांक देण्यात आलेला आहे.

या योजनेअंतर्गत गोदाम बांधकाम या घटकासाठी सरकारी व खाजगी उद्योग समूह आधारित व्यवसाय संस्था शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्था यांना अनुदान दिले जाणार आहे. 

गोदाम बांधकामांना अनुदान दिले जात असताना सोयाबीन मूल्य साखळी भागीदारांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत 250m क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. 

या योजनेअंतर्गत 250 m क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अंदाजे 28 लाख 80 हजार 250 रुपये इतका प्रकल्प खर्च ग्राह्य धरून त्या खर्चाच्या 50% अर्थात जास्तीत जास्त 14 लाख 40 हजार रुपये एवढा अनुदान पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. 

गोदाम बांधकाम ही बाब बँक कर्जाशी निगडित असल्याने अर्जदाराने रिझर्व बँकेच्या अधिकृत वित्तीय संस्थेकडून बँक कर्ज अनुदाना करता ग्राह्य धरून प्रकल्प सादर करणे आवश्यक राहील. बँकेचे कर्ज हे रिझर्व बँकेच्या अधिकृत वित्तीय संस्थेकडून ज्या बँकेच्या शाखांना आयएफसी कोड आहे अशा बँकेकडून घेणे आवश्यक राहील. 

याचबरोबर या योजनेअंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा अंतर्गत तेल घाला प्रति दिन 10 टन क्षमतेच्या तेल घाण्यासाठी किंवा मिनी ऑइल मिल आणि एक्सप्लेन या घटकासाठी अनुदान दिले जाणार आहे. 

यामधील प्रतिदिन 10 टन क्षमतेच्या तेल घाना उद्योगासाठी खरेदी व स्थापनेसाठी अनुदान दिले जाणार आहे बी आय एस किंवा समक्ष गुणवत्ता मानकांचे पालन करणारे आणि एकापेक्षा जास्त प्रकारच्या तेलबियावरती प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या यंत्रसामग्रीसाठी या योजनेअंतर्गत 33% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. 

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची कमाल रक्कम ही 9 लाख 90 हजार रुपये इतकी ग्राह्य धरून त्याच्या 33% प्रमाणामध्ये वैयक्तिक लाभार्थी शेतकरी उत्पादक संस्था किंवा नोंदणीकृत कपन्या खाजगी उद्योग सरकारी उद्योग यांना हे अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेमधील मिनी ऑइल मिल आणि एक्सप्रेस या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी व मूल्य साखळी भागीदारांना 50% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. 

मिनी ऑइल मिल आणि एक्सप्लेन या घटकाची किंमत जास्तीत जास्त आठ लाख रुपये एवढी निश्चित करून पात्र लाभार्थ्यांना चार लाख रुपये पर्यंत तर फिल्टर प्रेस शिवाय असलेल्या युनिट साठी सहा लाख रुपये प्रकल्प खर्च मर्यादा धरून जास्तीत जास्त 50% अर्थात तीन लाख रुपयापर्यंत अनुदान दिला जाणार आहे. 

या घटकाचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा मूल्य साखळी भागीदार इत्यादींना महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या तेल घाणा आणि गोदाम बांधकाम या बाबी करता तालुका कृषी कार्यालय मध्ये आवश्यक कागदपत्रासह लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

मान्सूनची वाटचाल मंदावली; या भागात पावसाची प्रतीक्षा | Monsoon Forecast 2026

मान्सूनची वाटचाल मंदावली; या भागात पावसाची प्रतीक्षा

 Monsoon Forecast 2026

Monsoon Forecast 2026

गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात 15 जून पर्यंत मान्सूनचा वेग मंद राहील असे अपडेट दिलेले आहेत. 

राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह मोठा पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही, यातच मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे राज्याच्या काही भागांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खरिपाच्या पेरणीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. गुरुवार ११ जून 2026 रोजी मान्सूनच्या संदर्भात हवामान विभागाच्या माध्यमातून नवा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

,IMD वर्तवलेल्या पावसाच्या विस्तारित कालावधीतील अंदाज: ११ ते१८ दरम्यान;विशेषतः राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची जोर कमी राहण्याची व मेघगर्जनेची शक्यता. १८ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण वाढू शकते व हे प्रमाण जूनच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता.

या अंदाजानुसार कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये हवामान दमट राहणार असून दुपारनंतर काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ठाणे व मुंबई या दोन्ही जिल्ह्यात मध्यम पावसाचा रायगड जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसासाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. 

मध्य महाराष्ट्रात पुण्यात सह सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा कमी होऊन काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस राहील.

उत्तर महाराष्ट्रात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे आणि साधारणपणे सर्वत्र हवामान कोरडे राहील नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. तर नाशिक आणि अहिल्यानगर मध्ये काही ठिकाणी तुरळ पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रात ११ जून रोजी चाळीसगाव, मालेगाव, शिरपूर, पाचोरा, जळगाव धुळे मालेगाव मनमाड कोपरगाव चोपडा या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाट सह मध्यम पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे मात्र पुढील दोन दिवसात संपूर्ण मराठवाड्यात हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो.

विदर्भात देखील अशीच परिस्थिती दिसून येणार आहे पूर्व विदर्भात मुख्यत्वे हवामान कोरडे राहील. पश्चिम विदर्भात अकोला अमरावतीसह काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या कालावधीत चिखली खामगाव अकोट अचलपूर अकोला कारंजा लाड वाशिम यवतमाळ वर्धा आर्वी वरुड काटोल या भागामध्ये विजेच्या कडकडासह पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेले आहेत. 

 या काळामध्ये वादळी वारा सुद्धा राहू शकतो याच्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा आव्हान देखील करण्यात आलेला आहे.