Recent Post

Popular Posts

मान्सूनची वाटचाल मंदावली; या भागात पावसाची प्रतीक्षा | Monsoon Forecast 2026

मान्सूनची वाटचाल मंदावली; या भागात पावसाची प्रतीक्षा

 Monsoon Forecast 2026

Monsoon Forecast 2026

गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात 15 जून पर्यंत मान्सूनचा वेग मंद राहील असे अपडेट दिलेले आहेत. 

राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह मोठा पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही, यातच मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे राज्याच्या काही भागांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खरिपाच्या पेरणीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. गुरुवार ११ जून 2026 रोजी मान्सूनच्या संदर्भात हवामान विभागाच्या माध्यमातून नवा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

,IMD वर्तवलेल्या पावसाच्या विस्तारित कालावधीतील अंदाज: ११ ते१८ दरम्यान;विशेषतः राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची जोर कमी राहण्याची व मेघगर्जनेची शक्यता. १८ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण वाढू शकते व हे प्रमाण जूनच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता.

या अंदाजानुसार कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये हवामान दमट राहणार असून दुपारनंतर काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ठाणे व मुंबई या दोन्ही जिल्ह्यात मध्यम पावसाचा रायगड जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसासाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. 

मध्य महाराष्ट्रात पुण्यात सह सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा कमी होऊन काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस राहील.

उत्तर महाराष्ट्रात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे आणि साधारणपणे सर्वत्र हवामान कोरडे राहील नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. तर नाशिक आणि अहिल्यानगर मध्ये काही ठिकाणी तुरळ पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रात ११ जून रोजी चाळीसगाव, मालेगाव, शिरपूर, पाचोरा, जळगाव धुळे मालेगाव मनमाड कोपरगाव चोपडा या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाट सह मध्यम पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे मात्र पुढील दोन दिवसात संपूर्ण मराठवाड्यात हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो.

विदर्भात देखील अशीच परिस्थिती दिसून येणार आहे पूर्व विदर्भात मुख्यत्वे हवामान कोरडे राहील. पश्चिम विदर्भात अकोला अमरावतीसह काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या कालावधीत चिखली खामगाव अकोट अचलपूर अकोला कारंजा लाड वाशिम यवतमाळ वर्धा आर्वी वरुड काटोल या भागामध्ये विजेच्या कडकडासह पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेले आहेत. 

 या काळामध्ये वादळी वारा सुद्धा राहू शकतो याच्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा आव्हान देखील करण्यात आलेला आहे.

आता या विवाहाला शासनाचे ₹2.5 लाख अनुदान || Divyang vivah Yojana

आता या विवाहाला मिळणार शासनाचे ₹2.5 लाख अनुदान, योजनेत मोठा बदल 

Divyang Yojana 

दिव्यांग – अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ; दिव्यांग–दिव्यांग विवाहासाठी नवीन घटक समाविष्ट, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन - मंत्री अतुल सावे.

दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा आणि सक्षमीकरण प्रदान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

या योजनेत केलेल्या बदलानुसार अनुदानाच्या रकमेत वाढ करून ही योजना अधिक प्रभावी करण्यात आली आहे.

या योजनेत दिव्यांग–दिव्यांग असा नवीन घटक समाविष्ट करण्यात आला आहे. 

दिव्यांग–अव्यंग आणि दिव्यांग–दिव्यांग विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय सामाजिक समता, सर्वसमावेशकता आणि भेदभावमुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असणार आहे.
नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग – अव्यंग विवाहासाठी १.५ लाख रुपये, तर दिव्यांग – दिव्यांग विवाहासाठी २.५ लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे. 


या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभहस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून, त्यापैकी 25 टक्के रक्कम दाम्पत्याने 3 वर्षांकरिता मुदतठेवीत ठेवणे अनिवार्य राहील. 

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहातून मिळणारे भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्थैर्य लक्षात घेता अनुदानवाढ गरजेची होती. 

शासनाचा हा निर्णय भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि प्रतिष्ठा या मूल्यांना अधोरेखित करणारा असून, समाज अधिक सर्वसमावेशक करण्यास मदत करणार आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती 

1 वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) आवश्यक आहे.

 2 दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. 

3 विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. 

4 विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे. 

आवश्यक कागदपत्रे

1.विवाह नोंदणी दाखला .
2.वर /वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले.
3.वर अथवा वधू यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
4.वर /वधूचे एकत्रित फोटो.
5.दोन प्रतिष्ठित व्यक्तीची शिफारसपत्रे.
6.महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास (Domiciled) प्रमाणपत्र.
7.आधार कार्ड ,मतदान कार्ड
8.राष्ट्रीय कृत बँकेचे वर वधू यांचे संयुक्त खात्याची सत्यप्रत.
9.पोष्टाचे वर वधू यांचे संयुक्त बचत खात्याची सत्यप्रत
10.रक्कम रू.4500/-चे संसार उपयोगी साहित्यांचे जी.एस.टी.सह पावती.

दिव्यांग – अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ करण्यास व दिव्यांग – दिव्यांग विवाह हा घटक नव्याने समाविष्ट करण्याचा दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रस्तावास व त्या अनुषंगाने या योजनेसाठी आवर्ती वार्षिक २४ कोटी रूपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

GR PDF 

दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना.

Krishi Mitra Bharti - सावधान 🚨 शेतकरी मित्र पदभरती साठी अर्ज करताय !

सावधान 🚨 शेतकरी मित्र पदभरती साठी अर्ज करताय ! 

Krishi Mitra Bharti

राज्यात कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून देण्यासाठी कृषीमंत्र्यांनी प्रत्येक गावामध्ये एक शेतकरी मित्र नेमणूक करण्याची घोषणा केली होती. पुढे ही पदभरती झाली नाही किंवा पदभरती राबवण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून कुठल्या सूचनाही निर्गमित करण्यात आल्या नाही. 

मात्र या घोषणेचा गैरफायदा घेत राज्यात सध्या कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया वरती बोगस जाहिरातीद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही फसव्या जाहिरातीला बळी न पडण्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आला आहे.


राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत होणाऱ्या पदभरतीची जाहिरात ही केवळ कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा प्रसिद्धी माध्यमाद्वारे जाहिरात दिले जाते. सध्या कृषी मित्र पदभरतीच्या नावाखाली बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात कृषी विभागांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

मात्र शेतकऱ्यांनी अशा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाने जाहिराती वरती विश्वास ठेवू नये अर्ज शुल्क भरवण्यासाठी पाठवण्यात येणारे वैयक्तिक खाते क्रमांक मोबाईल नंबर किंवा त्याच्या संदर्भातील लिंक वरती विश्वास ठेवू नये या पदभरतीसाठी कुठल्याही पोर्टल वरती रक्कम किंवा वैयक्तिक माहिती भरू नये अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. 

संशयास्पद जाहिराती अथवा संदेश आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासन किंवा संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




राज्य शासनाची घरकुल लाभार्थ्यांना खुशखबर || PMAY Gharkul yojana 2026

निवडणुका पार पडताच शासनाची घरकुल लाभार्थ्यांना खुशखबर.

PMAY Gharkul Yojana 2026

गेल्या अनेक दिवसापासून घरकुल अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सर्वच घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध लोकप्रतिनिधी थकीत असलेल्या घरकुल योजनांच्या अनुदानाबाबत मोठ्या प्रमाणात आवाज उठविला होता.



अखेर केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा घरकुल योजनेचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

GR येथे पहा 👇🏻👇🏻

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (अनुसूचित जमाती) घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी रु.1398,00,00,000/- व समरुप राज्य हिस्सा रु.932,00,00,000/-एवढा निधी वितरीत

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (अनुसूचित जाती) घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी रु. 970,50,00,000/- व समरुप राज्य हिस्सा रु. 647,00,00,000/-एवढा निधी वितरीत

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (सर्वसाधारण) घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रशासकीय निधीसह निधी रुपये 6000,00,00,000/- व राज्य समरुप हिस्सा रुपये 4000,00,00,000/-एवढा निधी वितरीत करणेबाबत.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (सर्वसाधारण) घटकांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रशासकीय निधीसह निधी रु. ६९६,७१,८०,०००/- व राज्य समरुप हिस्सा रु. ४६४,४७,८६,६६८/-एवढा निधी वितरीत



राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत नगरपरिषद सह महानगरपालिकाच्या निवडणुका पार पडताच राज्य शासनाने शहरी घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक निर्णय घेतलेला आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी ज्याच्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायती याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांच्या अनुदानाचा वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.



शहरी आवास योजनेमध्ये लाभार्थी पात्र झाल्यानंतर गेले अनेक दिवसापासून निधीचे वितरण करण्यात आलेलं नव्हते, बरेच सारे हप्ते प्रलंबित होते अशा लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

यांच्यामधील पहिला निर्णय हा 13 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेले ज्याच्यामुळे नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रामध्ये पात्र झालेले लाभार्थी तर 19 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थी यांना निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.



नगरपंचायत नगरपरिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांकरता 13 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 41030 इतक्या लाभार्थी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

या मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यापैकी 33403 लाभार्थ्यांना राज्य शासनाचा 133 कोटी 61 लाख आणि केंद्र शासनाला 200 कोटी 41 ला असे एकूण 334 निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे. 

सोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नगरपंचायतीला नगरपरिषदेला किती लाभार्थ्यांना निधी मंजुरी देण्यात आलेले याची लाभार्थी यादी सुद्धा जोडण्यात आलेली आहे.


शासन निर्णय येथे पहा 

👇🏻 👇🏻 

याचबरोबर आज 19 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका महापालिका क्षेत्रातील जे काही पात्र लाभार्थीत अशा लाभार्थ्यांना निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

यामध्ये 2581 लाभार्थी हे मंजूर करण्यात आलेले ज्यांना केंद्र शासनाचा 15 कोटी 48 लाख रुपये राज्य शासनाचा दहा कोटी 32 लाख असा 25 कोटी 81 लाख निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

शासन निर्णय येथे पहा 
👇🏻 👇🏻 

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकाम (BLC) (SLS Code-MH 688) अंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी (ST Component) केंद्र हिश्श्याचा व समरुप राज्य हिश्श्याचा निधी वितरीत

शासन निर्णय येथे पहा 
👇🏻 👇🏻 

पात्र झालेल्या लाभार्थ्यांना या अनुदानाचे वितरण होण्याची अतिशय मोठी अशी प्रतीक्षा होती या निधीमुळे या मानधन थकीत असलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.



अवकाळी पावसाने २७ जिल्ह्यातील हजारो हेक्टर बाधित; पंचनामे करण्याचे आदेश || Avkali Nuksan 2026

गारपीट अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषिमंत्र्यांचे आदेश.

Avkali Nuksan 2026

राज्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मे व जून या दोन्ही महिन्यांमध्ये राज्यातील 27 जिल्ह्यामधील 61 हजार चारशे हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले असून यापैकी 18 हजार 121 हेक्टर हे क्षेत्र केळी पिकाखालील आहे. 

अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव बुलढाणा सोलापूर पुणे अकोला अमरावती या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे एकंदरीत 27 जिल्ह्यामधील 61 हजार 400 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा प्राथमिक अहवाल वर्तवण्यात आलेला आहे. 

झालेल्या नुकसानी पैकी मे आणि जून महिन्यात झालेल्या नुकसानीमध्ये जळगाव जिल्ह्यात ७५९४ हेक्टर बाधित झालेल्या असून त्यापैकी 7216 हेक्टर क्षेत्र केळी फिका खालील आहे.

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना कृषिमंत्री यांनी आज दिल्या.

बऱ्याच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. 

आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत.

प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार शुक्रवारी काही ठिकाणी वादळी वारे व गारपीट झाली. यामुळे काही गावांमध्ये पत्र्याची घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच गहू, हरभरा व ज्वारी फळबागांचे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.