पोस्ट्स

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना | gopinath munde shetkari apghat suraksha sanugrah anudan yojana

इमेज
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना gopinath munde shetkari apghat suraksha sanugrah anudan yojana हि  योजना  २००५-०६  पासून कार्यन्वयित करण्यात आले योजना आहे. जी पूर्वी शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या नावाने राबवली जात होती. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येत अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना राबवली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे. गोपीनाथ मुंडे #शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता #महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती #कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असून, पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीत काम करताना ...

सोसायटीच्या थकीत पिककर्जाबाबत मोठा निर्णय; कर्जमाफीच काय? | Society Pik Karj OTS 2026

इमेज
सोसायटीच्या थकीत पिककर्जाबाबत मोठा निर्णय; कर्जमाफीच काय? Society Pik Karj OTS 2026 राज्यातील थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना सहकार मंत्री यांच्या माध्यमातून मात्र राज्यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवायला मंजुरी दिली आहे. GR 29.06.2026 PDF नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारीत सामोपचार परतफेड   योजना या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे बैठक मंत्रालयात पार पडली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.  राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.  या योजनेअंतर्गत 30 जून 2023 अखेर पर्यंत ची थकीत पीक कर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाचे थकीत हप्ते समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.  याचबरोबर एका सभासदाकडे ए...

शेतकऱ्यांना खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवून देणारी 'फळपिक विमा योजना' | Falpik vima yojana

इमेज
शेतकऱ्यांना खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवून देणारी 'फळपिक विमा योजना' Falpik vima yojana 2026 नैसर्ग‍िक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थ‍ितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हवामानावर आधारित फळपिक विमा योजना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा खात्रीचा पर्याय झाला आहे.  प्रधानमंत्री पीक वि योजनेंतर्गंत राज्याच्या कृषी विभागाकडून पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. राज्यात 01 June पासून विविध फळपिकांचा मृगबहार सुरू होत आहे. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेऊन खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवावी. असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्य स्तरीय पीक विमा समन्वय समिती मध्ये दिलेल्या सुचनांनुसार, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीकविमा योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी (Farmer ID) अनिवार्य करण्यात आलेला आहे.  राज्यात राबविल्या जाणाऱ्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना RWBCIS 2026 मृग बहार करिता शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक अर्थात ...

Shetkari Karjmafi - कर्जमाफी KYC कधी, कशी करायची? कर्जमाफी यादी कधी येणार?

इमेज
कर्जमाफी KYC कधी, कशी करायची? कर्जमाफी यादी कधी येणार?  Shetkari Karjmafi 2026 कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ मिळणार गेल्या काही वर्षापासून विविध नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची संधी निर्माण करून देणारी योजना आहे. राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात असून ही कर्जमाफी योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली असून योजनेची प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. पुण्यश...

Mahila Shetkari महिला शेतकऱ्यांसाठी शासनाचं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक; मंत्रिमंडळाची मंजुरी

इमेज
महिला शेतकऱ्यांसाठी शासनाचं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक; मंत्रिमंडळाची मंजुरी आता महिला शेतकरी होणार मालक, मिळणार शेतकरी दाखला  Mahila Shetkari kayda 2026 Maharashtra Women Farmer Bill 2026 राज्यात 1992 नंतर प्रथमच महिला शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्य शासन एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शेतीमध्ये महिलांचे कष्ट आणि योगदान हे पुरुषांच्या बरोबरीने आहे बऱ्याच ठिकाणी महिला शेतकरी म्हणून पुढे येत आहेत.  मात्र महिलांच्या नावावरती जमिनीचा सातबारा नसल्यामुळे अनेकदा महिलांना शेतकरी म्हणून दर्जा मिळत नाही महिलांना पीक कर्ज असतील विमा असेल किंवा इतर राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ हा शासनाच्या माध्यमातून दिला जात नाही.  महिलांची ओळख ही केवळ शेतमजूर किंवा शेतकऱ्याची मदतनीस अशीच आहे आणि हीच ओळख पुसून महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे विधेयक आणला जात आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ला राज्य मंत्रिमंडळाच्या मा...

अखेर शक्तिपीठ महामार्गात नवीन बदल; GR आला | Shaktipeeth Mahamarg New Update

इमेज
अखेर शक्तिपीठ महामार्गात नवीन बदल; GR आला Shaktipeeth Mahamarg New Update अखेर मोठ्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गात बदल करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील GR निर्गमित करून या महामार्गाचे नवीन आखणीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात शक्तीपीठ महामार्गासाठी दि.०७.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नागपूर गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या ८०२.५९२ कि.मी लांबीच्या आखणीस मान्यता देण्यात आलेली होती. या आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली प्रारंभिक अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीसाठी दि.१५.१०.२०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आलेली आहे.  यानंतर दि.२८.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास म...

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

इमेज
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू.   Assk registration 2026 Aple sarkar seva kendra आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.  अहिल्यानगर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण तसेच नगरपरिषद नगरपंचायत याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील 2430 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 6 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आपले सेवा केंद्र सुरु करणाऱ्या इच्छुकांनी https://ahilyanagaraaplesarkar.com/index.php या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने 22 जून 2026 पासून ६ जुलै 2026 पर्यंत अर्ज करावेत. आपले सरकार सेवा केंद्राबाबत अटी व शर्ती तसेच रिक्त असलेल्या केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करु...