पोस्ट्स

सावधान! पीक विम्याचे नियम बदलले; 'ही' १ चूक भोवणार; नवी बदल तुम्हाला ठाऊक आहेत का? | PikVima Yojana 2026

इमेज
सावधान! पीक विम्याचे नियम बदलले; 'ही' १ चूक भोवणार खरीप पीकविमा योजनेत नवे बदल, पीकविमा भरताना या चुका टाळा; अन्यथा योजनाचा लाभ बंद ५ वर्षासाठी ब्लॉक, नमो शेतकरी हप्ताही केला जाणार बंद  PikVima Yojana 2026 राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात 2026 च्या खरीप हंगामामध्ये सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, मात्र हे मंजुरी देत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेले याचबरोबर शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी मदत करतील असे बदल न करता शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत ज्यामुळे या योजनेच्या अंतर्गत होणारे गैरप्रकार आता थांबणार आहेत. राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी काही कडक नियम लागू केले आहेत. यात ई-पीक पाहणी सक्तीची करण्यापासून ते चुकीची माहिती दिल्यास होणाऱ्या कारवाईपर्यंतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात खरीप पिक विमा योजना 2026 ही 12 जिल्हा समूहासाठी बीड पॅटर्न अर्थात Cup & Cap Model 80:110 नुसार राबवली जाणार आहे. ज्याच्यामध्ये विमा कंपनीची नुकसान भर...

हे आहेत शेतमालाचे राज्यातील आजचे बाजारभाव || bajar bhav today

इमेज
हे आहेत आजचे काही महत्वाच्या बाजार पेठेतील  बाजारभाव  Bajar Bhav today   शेतमाल : कापूस  COTTON MARKET शेतमाल:  कांदा  KANDA MARKET  शेतमाल :तूर  Tur Market सोयाबिन   Soyabin market today शेतमाल : मका  Maize Market today शेतमाल : उडीद  Black gram market today शेतमाल :  ज्वारी Sorghum Market Today शेतमाल :   गहू Wheat Market Today  शेतमाल :   मूग शेतमाल : हळद/ हळकुंड  विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा . #BAJARBHAV

शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना | gogalgay nuksan

इमेज
शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना  gogalgay nuksan सध्या खरीप हंगाम सुरु आहे. बळीराजाची पेरणीची लगबग सुरु असून चांगलं पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करतात.  परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून ढगाळ , आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंखी गोगलगायीची संख्या वाढत आहे.  त्यांच्यामुळे पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे. त्याविषयी कृषि विभागाने दिलेली माहिती… शंखी गोगलगाय साधारणपणे पाच ते सहा वर्ष जिवंत राहते. जीवनक्रम अंडी, पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्था मध्ये पूर्ण होतो. हिवाळ्यात सुप्तावस्थेमध्ये जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. शंखी गोगलगायीचा प्रसार शेतात वापरण्यात येणारी औजारे, यंत्रसामग्री, वाहने, बैलगाडी, शेणखत, विटा, माती, वाळू, रोपे, बेणे, कुंड्या इत्यादी मार्फत होतो. या गोगलगायी रात्रीच्या वेळी पानांना, फुलांना अनियमित व मोठ्या आकाराची छिद्र पाडून पानांच्या कडा खातात. काही प्रमाणात झाडांच्या शेंगा, फळे, कोवळ्या सालीवर देखील उपजीविका करुन ...

राज्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग, शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वरती अपलोड | shetkari Karjmafi GR

इमेज
राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग, शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वरती अपलोड Shetkari Karjmafi Process विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2020 ही योजना आणण्यात आलेली आहे.  या योजनेअंतर्गत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वरती भरण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात आलेले असून यानुसार आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वरती अपलोड करण्याचं काम युद्ध स्तरावर सुरू आहे.  यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 29409 कर्ज खात्याची माहिती आतापर्यंत पोर्टल वरती अपलोड केली असून 241 खात्याची माहिती अपलोड करणे बाकी आहे.  विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांच्या २५ जून २०२६ रोजीच्या प्रगती अहवालानुसार, उर्वरित २४१ खात्यांपैकी एक हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेली खाती, आधार नसलेले लाभार्थी, मयत सभासद खातेदार तसेच दुबार पीक कर्ज...

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

इमेज
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू.   Assk registration 2026 Aple sarkar seva kendra आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.  अहिल्यानगर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण तसेच नगरपरिषद नगरपंचायत याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील 2430 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 6 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आपले सेवा केंद्र सुरु करणाऱ्या इच्छुकांनी https://ahilyanagaraaplesarkar.com/index.php या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने 22 जून 2026 पासून ६ जुलै 2026 पर्यंत अर्ज करावेत. आपले सरकार सेवा केंद्राबाबत अटी व शर्ती तसेच रिक्त असलेल्या केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करु...

वृद्ध कलाकार मानधन योजना, पहा कसा करायचा अर्ज || vrudh kalakar mandhan yojana

इमेज
वृद्ध कलाकार मानधन योजना, पहा कसा करायचा अर्ज    vrudh kalakar mandhan yojana rajarshi shahu maharaj kalakar mandhan yojana राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना रू. 5000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) मानधन देण्यात येते. भजनी , किर्तनी, गोंधळी, आराधी , तमाशा, साहित्यिक, गायक , वादक, कवी , लेखक अशा विविध कला क्षेत्रातील वृद्ध कलाकार, महिला, विधवा, दिव्यांग कलाकार यांना 5000 रु पर्यंत मासिक मानधन देणारी योजना  राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान  योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येते.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी मुदतीत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा.  शासनाने याबाबत कार्यक्रम आखून दिलेला आहे. परंतु अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे सन 2026 या वर्षासाठी वृध्द कलावंताचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी वृध्द साहित्यिक व वृध्द क...

या बँकेच्या कर्जदारांना मोठा दिलासा; एकरक्कमी कर्ज परतफेड योजना सुरू | Society Pik Karj OTS 2026

इमेज
या बँकेच्या कर्जदारांना मोठा दिलासा; एकरक्कमी कर्ज परतफेड योजना सुरू Society Pik Karj OTS 2026 राज्यातील थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना सहकार मंत्री यांच्या माध्यमातून मात्र राज्यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवायला मंजुरी दिली आहे. GR 02.07.2026 PDF नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत. GR 29.06.2026 PDF नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारीत सामोपचार परतफेड   योजना या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचे बैठक मंत्रालयात पार पडली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.  राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यांच्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी एक रकमे कर्ज परतफेड योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.  या योजनेअंतर्गत 30 जून 2023 अखेर पर्यंत ची थकीत पीक कर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदत...