Pik Vima Yojana 2026: योजनेत बदल शक्य? राज्यात विक्रमी ७५.८३ लाख अर्ज
प्रधानमंत्री पीक विमा योजना योजनेत बदल शक्य? राज्यात विक्रमी ७५.८३ लाख अर्ज Pik Vima Yojana 2026 पीकविमा योजनेमध्ये काही त्रुटी असल्याने आणि २०२५ वर्षातील पीक विमा न मिळाल्याने विविध शेतकरी संघटना व शेतकरी यांच्याकडून योजना सुधारण्याची व ट्रिगर पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे मात्र राज्यात खरीप हंगाम २०२६ प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. या योजनेअंतर्गत १० ऑगस्ट पर्यंत राज्यभरातून तब्बल ७५,८३,००० (७५.८३ लाख) अर्ज प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याचा सुमारे ₹४८९ कोटी रुपयांचा हप्ता या योजनेअंर्तगत भरला आहे. बँक पातळीवरील आणि इतर तांत्रिक प्रक्रियेतील अर्ज अंतिम झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय अर्जांची स्थिती (District-wise Application Data) नांदेड ९ लाख+ सर्वाधिक प्रतिसाद; पीक विमा वाटपानंतर मोठा सहभाग बीड ८,७०,४७९ गेल्या वर्षाच्या तुलनेत घट लातूर ५,७५,००० ...