या शेतकऱ्यांना ₹२२,५०० हेक्टरी, फळपीक विमा ही मिळणार || Amba Kaju Nuksan Bharpai
नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२२,५०० भरपाई; तर फळपीक विमा ही मिळणार Amba Kaju Nuksan Bharpai 2026 राज्यात चालू वर्षात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या अंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला आणि याच पार्शमुळे ते कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई सह फळ पिक विमा मंजूर केला असल्याची माहिती आज सभागृहाला दिली. यापूर्वी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी, झालेल्या नुकसानी संदर्भात कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत 17 मार्च 2026 रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर शासनाने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविला आहे. सुकृत दर्शनी राज्यात आंबा काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणा...