ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना; अर्ज सुरू
Ustod Kamgar Hostel Scheme
राज्यात स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची वसतिगृह योजना म्हणजे संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना.
ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीच्या हंगामामध्ये अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागते यामुळे त्यांच्या पाल्यांना शिक्षण घेता येत नाही, शिक्षणात खंड पडतो आणि हाच खंड टाळण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी राज्यात संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना राबवली जात आहे.
राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभाग व लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना ही योजना राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्यात एकूण 82 वसतिगृह सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे ज्याच्यात 41 वसतिगृह ही मुलांसाठी, तर 41 वसतिगृह मुलीसाठी असणार आहेत या प्रत्येक वस्तीगृहाची क्षमता ही 100 विद्यार्थ्याचे असणार आहे.
संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना राबवली जात असताना बीड अहिल्यानगर जालना लातूर धाराशिव परभणी नाशिक अशा ज्या जिल्ह्यांमध्ये ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे तिथे या योजनेअंतर्गत वसतिगृह प्राधान्याने सुरू केले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास आणि भोजना व्यतिरिक्त शालेय गणवेश पिटी युनिफॉर्म पाठ्यपुस्तके वह्या आवश्यक शैक्षणिक साहित्य वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य वैद्यकीय सुविधा आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी अशा प्रकारचा सुविधांचा लाभ देखील शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या या संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने करता शैक्षणिक वर्ष 2026 27 करता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आले आहेत.
या प्रवेश प्रक्रियेमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 90%, ऊसतोड कामगारांचे पाल्य असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5%, ऊसतोड कामगार असलेल्या विधवा परितक्त्या व एकलपालक असलेल्या त्यांच्या पाल्यकरता 3% तर ज्यांचे मृत्यू झालेले पालक ऊसतोड कामगार होते अशा अनाथ पाडण्यासाठी 2% आरक्षण लागू करण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत सन 2026 27 या वर्षाकरिता वस्तीगृहामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 30 जून 2026 पर्यंत अर्ज करणे आवश्यक असून यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सात जुलै 2026 पर्यंत अंतिम करण्यात येणार आहे तर इयत्ता अकरावी आणि बारावी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज करावे लागणार असून 31 जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया अंतिम करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत वस्तीगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाची ऊसतोड कामगार म्हणून कामगार महामंडळाकडे नोंद असणं गरजेच आहे पालकाकडे ऊसतोड कामगार असल्याचे अधिकृत ओळखपत्र असावे याचबरोबर त्या विद्यार्थ्यांचा वस्तीग्रहाच्य परिसरातील मान्यताप्राप्त शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्र
- पालकाचे ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र किंवा कारखान्याचे मुकादमाचे ऊसतोड कामगार असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांच शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- विद्यार्थी आणि पालकाचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे गुणपत्रिका
- विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईज चे फोटो
- जात प्रमाणपत्र असेल जाती अंतर्गत असेल तर जातीचा दाखला अशी कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत.
अर्ज कसा करावा.
या योजनेच्या लाभासाठी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय किंवा संबंधित वस्तीगृहाच्या गृहपालाकडून वार्डन कडून या योजनेसाठीचा अर्ज उपलब्ध करून घ्यावा आणि विहित नमुन्यातील हा अर्ज कागदपत्रासह दिलेल्या मुदतीमध्ये जमा करावा लागेल.
या योजनेच्या अंतर्गत प्रवेश गुणवत्तेच्या आधारावरती दिले जातात तसेच एका कुटुंबामधील जास्तीत जास्त दोन पाल्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
#SantBhagwanbabaVasatigruh, #SantBhagwanbabaHostel
