पोस्ट्स

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

इमेज
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक २१ जुलै २०२६ निर्णय संक्षिप्त कृषी विभाग - नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे होणार शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय. महाविद्यालयात दरवर्षी १२० जागांवर होतील प्रवेश. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्न या महाविद्यालयामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यांना होणार लाभ. फळे, भाजीपाला, फुले तसेच प्रक्रीया व मुल्यवर्धनासाठी अभ्यास, संशोधनास चालना. महाविद्यालयासाठी ५१ नियमित पदांनाही मान्यता. नागपूर व अमरावती विभागातील 11 जिल्ह्यांमध्ये संत्रा, मोसंबी, आंबा, लिंबू, पेरू इत्यादी व मुख्य फळ पिकाव्यतिरिक्त कमी पाण्यावर तग धरणारी आवळा, सिताफळ या फळपिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील फळे, भाजीपाला व फुलशेतीची विविधता बघता उद्यानविद्या महाविद्यालयाची आवश्यकता आहे. या महाविद्यालयामध्ये फळे, भाजीपाला, फुले तसेच, प्रक्रिया व मूल्यवर्धन या संबंधीच्या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याने त्यासंबंधीच्या अभ्यास व संशोधनाला चालना मिळणार आहे....

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार | shetkari Karjmafi yadi

इमेज
राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग, शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार Shetkari Karjmafi yadi  विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे.  या योजनेअंतर्गत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वरती भरण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात आलेले असून यानुसार आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वरती अपलोड करण्याचं काम युद्ध स्तरावर सुरू आहे.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 22 जुलैच्या औचित्याने यादी प्रसिद्ध करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मा. मुख्यमंत्री ...

या शेतकऱ्यांना ₹२२,५०० हेक्टरी, फळपीक विमा ही मिळणार || Amba Kaju Nuksan Bharpai

इमेज
नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२२,५०० भरपाई; तर फळपीक विमा ही मिळणार  Amba Kaju Nuksan Bharpai 2026 राज्यात चालू वर्षात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या अंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई सह फळ पिक विमा मंजूर केला असल्याची माहिती आज सभागृहाला दिली.  यापूर्वी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी, झालेल्या नुकसानी संदर्भात कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत 17 मार्च 2026 रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर शासनाने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल, कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविला आहे. सुकृत दर्शनी राज्यात आंबा काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे न...

नवी शिधापत्रिका मिळणार! २२ ते ३१ जुलै राज्यभर विशेष मोहीम | Ration Card New Update 2026

इमेज
नवी शिधापत्रिका मिळणार! २२ ते ३१ जुलै राज्यभर विशेष मोहीम. नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम Ration Card New Update 2026 जर तुमचे नाव अजूनही रेशन कार्डवर नसेल किंवा तुम्हाला नवीन शिधापत्रिका काढायची असेल, तर शासनाने एक अत्यंत महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभरात २२ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवून नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दोन जून 2026 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्याला नवीन इष्टांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या उपलब्ध ईस्टांकाचा वापर करून एकही पात्र लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.   या मोहिमे अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न क...

९०% अनुदानावर कुक्कुटपालन योजना, या जिल्ह्यात अर्ज मागवले | Kukkutpalan Yojana 2026

इमेज
९०% अनुदानावर कुक्कुटपालन योजना, या जिल्ह्यात अर्ज मागवले Kukkutpalan Yojana 2026 २,५०० पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प कुक्कूटपालन अनुदान योजना पशुसंवर्धन विभागामार्फत ९०% अनुदानावर २५०० कुक्कुट पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प लावण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यात अर्ज मागविण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात अंडी उत्पादन व्यवसायास मिळावी, स्थानिक स्तरावर पोषणमूल्ययुक्त अंड्यांची उपलब्धता व्हावी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे अशा उद्देशाने क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पासाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) व महिला बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यातील पात्र संस्थांमार्फत प्रत्येकी २,५०० पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. प्रकल्पांतर्गत उत्पादित अंड्यांचा पुरवठा आवश्यकतेनुसार अंगणवाडी, आश्रमशाळा, विद्यार्थी वसतिगृहे तसेच स्थानिक बाजारप...

ग्रामपंचायतींना ५ नवीन कामांसाठी निधी; विशेष अनुदान १५ ते २० लाख | Grampanchayat jansuvidha vishesh anudan yojana

इमेज
ग्रामपंचायतींना ५ नवीन कामांसाठी निधी; विशेष अनुदान १५ ते २० लाख गावात होणार वाचनालय, सोलर अन् क्रीडांगण! ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा योजनेचा नवा GR  Grampanchayat jansuvidha vishesh anudan yojana राज्यातील ग्रामपंचायत मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत नवीन पाच बाबींचा समावेश करून या बाबींकरता निधी खर्च करण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 20 जुलै 2026 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून या योजनेमधील नवीन बदलाला मंजुरी देण्यात आलेली आहे. नवीन शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतीला गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करणं या कामासाठी कमाल 15 लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तर शासकीय कार्यालयावरील सोलर बसवणे या बाबीसाठी 20 लाख रुपयांची खर्च मर्यादा देण्यात आलेली आहे.   याचप्रमाणे वाचनालय इमारत बांधकाम करणे या बाबीसाठी देखील वीस लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.  तसेच गावातील मैदानाचा विकास करणे या बाबीसाठी 20 लाख तर गावाच्या ...

पुढील ३ दिवस जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट | Monsoon Forecast 2026

इमेज
पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट  Monsoon Forecast 2026 गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात 20 जुलै पर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज वर्तविला आहे. राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह मोठा पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही, यातच मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे राज्याच्या काही भागांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या अंदाजानुसार कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये हवामान दमट राहणार असून दुपारनंतर काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ठाणे व मुंबई या दोन्ही जिल्ह्यात मध्यम पावसाचा रायगड जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसासाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 18 जुलै रोजी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील घाट...