पोस्ट्स

नवी शिधापत्रिका मिळणार! २२ ते ३१ जुलै राज्यभर विशेष मोहीम | Ration Card New Update 2026

इमेज
नवी शिधापत्रिका मिळणार! २२ ते ३१ जुलै राज्यभर विशेष मोहीम. नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम Ration Card New Update 2026 जर तुमचे नाव अजूनही रेशन कार्डवर नसेल किंवा तुम्हाला नवीन शिधापत्रिका काढायची असेल, तर शासनाने एक अत्यंत महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभरात २२ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवून नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दोन जून 2026 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्याला नवीन इष्टांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या उपलब्ध ईस्टांकाचा वापर करून एकही पात्र लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.   या मोहिमे अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न क...

९०% अनुदानावर कुक्कुटपालन योजना, या जिल्ह्यात अर्ज मागवले | Kukkutpalan Yojana 2026

इमेज
९०% अनुदानावर कुक्कुटपालन योजना, या जिल्ह्यात अर्ज मागवले Kukkutpalan Yojana 2026 २,५०० पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प कुक्कूटपालन अनुदान योजना पशुसंवर्धन विभागामार्फत ९०% अनुदानावर २५०० कुक्कुट पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प लावण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यात अर्ज मागविण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात अंडी उत्पादन व्यवसायास मिळावी, स्थानिक स्तरावर पोषणमूल्ययुक्त अंड्यांची उपलब्धता व्हावी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे अशा उद्देशाने क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पासाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) व महिला बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यातील पात्र संस्थांमार्फत प्रत्येकी २,५०० पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. प्रकल्पांतर्गत उत्पादित अंड्यांचा पुरवठा आवश्यकतेनुसार अंगणवाडी, आश्रमशाळा, विद्यार्थी वसतिगृहे तसेच स्थानिक बाजारप...

ग्रामपंचायतींना ५ नवीन कामांसाठी निधी; विशेष अनुदान १५ ते २० लाख | Grampanchayat jansuvidha vishesh anudan yojana

इमेज
ग्रामपंचायतींना ५ नवीन कामांसाठी निधी; विशेष अनुदान १५ ते २० लाख गावात होणार वाचनालय, सोलर अन् क्रीडांगण! ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा योजनेचा नवा GR  Grampanchayat jansuvidha vishesh anudan yojana राज्यातील ग्रामपंचायत मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत नवीन पाच बाबींचा समावेश करून या बाबींकरता निधी खर्च करण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 20 जुलै 2026 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून या योजनेमधील नवीन बदलाला मंजुरी देण्यात आलेली आहे. नवीन शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतीला गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करणं या कामासाठी कमाल 15 लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तर शासकीय कार्यालयावरील सोलर बसवणे या बाबीसाठी 20 लाख रुपयांची खर्च मर्यादा देण्यात आलेली आहे.   याचप्रमाणे वाचनालय इमारत बांधकाम करणे या बाबीसाठी देखील वीस लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.  तसेच गावातील मैदानाचा विकास करणे या बाबीसाठी 20 लाख तर गावाच्या ...

पुढील ३ दिवस जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट | Monsoon Forecast 2026

इमेज
पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट  Monsoon Forecast 2026 गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात 20 जुलै पर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज वर्तविला आहे. राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह मोठा पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही, यातच मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे राज्याच्या काही भागांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या अंदाजानुसार कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये हवामान दमट राहणार असून दुपारनंतर काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ठाणे व मुंबई या दोन्ही जिल्ह्यात मध्यम पावसाचा रायगड जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसासाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 18 जुलै रोजी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील घाट...

बांधकाम कामगारांसाठी चार नवीन योजना | Bandhkam kamgar yojana

इमेज
बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या चार नवीन योजनांना मंजुरी Bandhkam kamgar yojana  राज्यातील बांधकाम कामगारासाठी एका अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे राज्य शासनाकडून आज 13 जुलै 2026 रोजी राज्यातील बांधकाम कामगारासाठी चार नव्या योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. यामध्ये बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती योजना असेल याचबरोबर अपघाती मृत्यू किंवा बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर दिले जाणारे मदत असेल याचबरोबर प्रसूती सहाय्य योजना व बांधकाम कामगारांना पेन्शन योजना अशा योजनांचा समावेश आहे. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना लागू करण्याबाबत. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व ...

VB-G RAMG Maharashtra अखेर प्रतीक्षा संपली; व्हीबी-जी-राम-जी योजनेसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता

इमेज
अखेर प्रतीक्षा संपली; व्हीबी-जी-राम-जी योजनेसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता VB-G RAMG  maharashtra 1st installment 2026 राज्यात मनरेगा अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी हे गेल्या अनेक दिवसापासून केंद्राच्या निधी अभावी अनुदानापासून वंचित आहेत. या विरोधात सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विविध लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याकडून या योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारला पाठपुरावा करण्यात आला होता अखेर केंद्र शासनाकडून प्रलंबित असलेला निधी वितरीत केला आहे. आज पाच जुलै 2026 रोजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दूरदर्श प्रणाली मार्फत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यासोबत विकसित भारत आणि अजिविका मिशन ग्रामीण अर्थात   Viksit Bharat–Guarantee for Rozgar and Aajeevika Mission (Gramin) [VB-G-RAM-G]  या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व सोबतच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना पहिला हप्ता म्हणून 25 हजार 863 कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्या...

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर Grampanchayat Election 2026

इमेज
मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले, ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर  Grampanchayat Election 2026 राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना फायनल झाली आरक्षणाची सोडत ही झाली परंतु त्या गावागावात सर्वांना प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे नवीन प्रभाग रचनेनुसार आता मतदार यादी कशी बनणार आणि याच्या संदर्भातील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे! मतदार यादी १५ एप्रिलची, पण नवीन प्रभाग रचनेनुसार मतदान कसं होणार? पहा निवडणूक आयोगाचा नवीन नियम! राज्यातील तब्बल 15245 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे होय, यामध्ये २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच २०२६ या चालू वर्षात मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2026 च्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा स परिपत्रक आलेला आहे ज्यानुसार प्रभाग रचना आणि आरक्षण सोडती नंतर आता त...