पोस्ट्स

PAHSKY Shetkari Karjmafi अखेर प्रतीक्षा संपली, कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या आणि केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा.  PAHSKY Shetkari Karjmafi  आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ या योजनेची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. याच बैठकीदरम्यान कर्जमाफी अंतर्गत पात्र झालेल्या आणि आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आज 7 ऑगस्ट 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत केवायसी केलेल्या 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीच्या लाभाचा वितरण करण्यात आले. योजनेच्या पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या मात्र अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे. संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्...

Teacher recruitment 2026 - राज्यात 32209 शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

इमेज
पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू Teacher recruitment 2026 राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 30209 पदांची पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या 13351, महानगरपालिकेच्या 1954, नगरपालिका नगरपरिषदांच्या 280, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 12148, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील 2421, तर शासकीय विद्यानिकेतनातील 56 अशा एकूण 30209 रिक्त पदांची ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामधील 19881 पदे ही मुलाखती शिवाय तर खाजगी संस्था मधील 10328 पदे ही मुलाखतीसह भरली जाणार आहेत. या रिक्त पदामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांसाठी 14320 पदांसाठी तर सहावी ते आठवी या वर्गांकरिता दहा हजार बारा पदांचा इयत्ता नववी ते दहावीच्या 5513 पदांचा तर इयत्ता अकरावी बारावीच्या 364 पदाचा समावेश आहे.  राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 27 मे ते पाच जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती या चाचणीसाठी दोन लाख 28 हजार 808 उमेदवारांना नोंदणी पूर्ण क...

पिक स्पर्धा खरीप हंगाम 2026, ऑनलाईन अर्ज सुरू | Pik Spardha Kharip 2026

इमेज
राज्यात खरीप हंगाम 2026 करता पीक स्पर्धा सुरू, ऑनलाइन अर्ज मागवले.  Pik Spardha Kharip 2026 राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात पीक उत्पादकता वाढावी यासाठी शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या व उत्कृष्ट उत्पादन घेणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित केली जाते.  खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामामध्ये राबवली जाणारी ही पिक स्पर्धा योजना खरीप हंगाम 2026 करता सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे. राज्यात स्वतः जमीन असणाऱ्या व स्वतःची कमीत कमी एक एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत खरीपासाठी 11 पिकासाठी स्पर्धेमध्ये भाग घेता येतो. खरीप हंगामात भात ज्वारी बाजरी, मका नाचणीतून मुरित सोयाबीन भुईमूग आणि सूर्यफूल अशा 11 पिकासाठी ही स्पर्धा राबवली जाते. पीक स्पर्धे अंतर्गत राज्यस्तरीय तीन पारितोषिक दिले जातात ज्याच्यामध्ये पहिलं पारितोषिक हे 50 हजार रुपये दुसरे 40 हजार तर तिसरं पारितोषिक 30000 रुपये असणार आहे. तर जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन पारित...

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

इमेज
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू.   Assk registration 2026 Aple sarkar seva kendra जालना जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये रिक्त असलेल्या तशाच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 735 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.  जालना जिल्ह्यातील रिक्त असलेल्या या 735 जागांकरिता 6 ऑगस्ट 2026 ते 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ खाली दिले आहे. ASSK registration portal Jalana - https://asskjalna.recruitonline.in/ जालना जिल्हा आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात खालील लिंक वरती पहा. जिल्हास्तरीय सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जाहिरात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या 633 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले असून पात्र उमेदवारांना 29 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेला आहे.  चंद्रपूर जिल्ह्याची...

शेळी,कुकुटपालनसाठी 50 लाख रु.अनुदान; लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन | national livestock mission

इमेज
पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित ‘राष्ट्रीय पशुधन अभियान’ योजना national livestock mission 2026   national livestock mission 2025  लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन   केंद्र शासनाने सन 2021-22 या  वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत रा ष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी प्रदान केलेली आहे .  सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती, तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनाकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान NLM)राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना (Livestock Insurance Scheme) राज्यात राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी   New Guidelines NLM Click Here NLM Website अनुदानाची अधिकतम मर्यादा  शेळी-मेंढी पालनाकरिता रु. 50 लक्ष,   कुक्कुट पालनाकरिता रु. 50 लक्ष,   वराह पालनाकरिता रु. 30 लक्ष  पशुखाद्य व वैरण विकास य...

कोणत्या महसूल मंडळात अतिवृष्टी; कुठे किती पाऊस | Maharain Maharashtra 2026

इमेज
कोणत्या महसूल मंडळात अतिवृष्टी; कुठे किती पाऊस Maharain Maharashtra 2026 महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध कृषी विभागामार्फत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या असून पर्जन्यमानाचा महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक आकडेवारी अहवाल https://maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.  https://maharain.maharashtra.gov.in/test/maharain/ कृषी व पदुम विभागाच्या ८ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये ‘महावेध’ प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी भागीदारीतुन ‘बांधा-मालक व्हा- चालवा’ (बीओओ) तत्वावर अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सेवा पुरवठादार संस्था म्हणुन नियुक्ती केली आहे. प्रकल्पातंर्गत राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  पर्जन्यमानाची आकडेवारीसाठी महारेन व महावेध या दोन स्वंतत्र प्रणाली कार्यान्वित ठेवण्याऐवजी महावेध प्रणालीमधील पर्जन्यविषयक आकडेवारी महारेन संकेत ...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

इमेज
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 04 ऑगस्ट 2026 निर्णय संक्षिप्त कृषी व पदुम विभाग -गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ. आता योजनेत भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश होणार. महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्यामुळे दिलासा. यापूर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे. शेती करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेल्या, शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वर्ष वयोगटातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पति/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलग...