पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट | Monsoon Forecast 2026
पुढील ५ दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट Monsoon Forecast 2026 गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात १४ सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज वर्तविला आहे. राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह मोठा पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही, यातच मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे राज्याच्या काही भागांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या काळामध्ये वादळी वारा सुद्धा राहू शकतो याच्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा आव्हान देखील करण्यात आलेला आहे. मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना...