अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर; नियमित कर्जदारांना ५०,००० प्रोत्साहनपर अनुदान
Shetkari Karjmafi Yojana 2026
राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.
शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते त्याकरिता समिती गठीत केलेली आहे.
राज्यातील 30 सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आज जाहीर करण्यात आली.
याचबरोबर जे शेतकरी आपल्या पीककर्जाची नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जमाफी तसेच प्रोत्साहन पर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रना सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.