पोस्ट्स

अखेर शक्तिपीठ महामार्गात नवीन बदल; GR आला | Shaktipeeth Mahamarg New Update

इमेज
अखेर शक्तिपीठ महामार्गात नवीन बदल; GR आला Shaktipeeth Mahamarg New Update अखेर मोठ्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गात बदल करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील GR निर्गमित करून या महामार्गाचे नवीन आखणीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात शक्तीपीठ महामार्गासाठी दि.०७.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नागपूर गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या ८०२.५९२ कि.मी लांबीच्या आखणीस मान्यता देण्यात आलेली होती. या आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली प्रारंभिक अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीसाठी दि.१५.१०.२०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आलेली आहे.  यानंतर दि.२८.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास म...

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

इमेज
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू.   Assk registration 2026 Aple sarkar seva kendra आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.  अहिल्यानगर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण तसेच नगरपरिषद नगरपंचायत याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील 2430 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 6 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आपले सेवा केंद्र सुरु करणाऱ्या इच्छुकांनी https://ahilyanagaraaplesarkar.com/index.php या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने 22 जून 2026 पासून ६ जुलै 2026 पर्यंत अर्ज करावेत. आपले सरकार सेवा केंद्राबाबत अटी व शर्ती तसेच रिक्त असलेल्या केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करु...

राज्यात ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana

इमेज
लेक लाडकी सुधारित योजना   Lek Ladki Yojana महाराष्ट्रात  मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे अशी अनेक उद्दिष्ट घेऊन   ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana   ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली  आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणा करिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सन २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष...

या शेतकऱ्यांना ₹२२,५०० हेक्टरी, फळपीक विमा ही मिळणार || Amba Kaju Nuksan Bharpai

इमेज
नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२२,५०० भरपाई; तर फळपीक विमा ही मिळणार  Amba Kaju Nuksan Bharpai 2026 राज्यात चालू वर्षात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या अंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला आणि याच पार्शमुळे ते कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई सह फळ पिक विमा मंजूर केला असल्याची माहिती आज सभागृहाला दिली.  यापूर्वी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी, झालेल्या नुकसानी संदर्भात कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत 17 मार्च 2026 रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर शासनाने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविला आहे. सुकृत दर्शनी राज्यात आंबा काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणा...

मोठी बातमी! अखेर VB-G RAMG योजनेचे नवीन नियम जाहीर | VB-G RAMG draft Rules 2026

इमेज
मोठी बातमी! अखेर VB-G RAMG योजनेचे नवीन नियम जाहीर VB-G RAMG draft Rules 2026 केंद्र शासनाच्या माध्यमातून 22 मे 2026 रोजी एक अधिसूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ऐवजी लागू केल्या जाणाऱ्या VB-G RAMG योजनेचे draft Rules 2026 प्रकाशित केले आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून VB-G RAMG योजनेचे नवीन नियम जाहीर करण्यात आलेले आहेत.  शुक्रवार 22 मे 2026 रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून या योजनेच्या नियमाचा एक ड्राफ्ट मसुदा प्रकाशित करण्यात आलेला आहे, जे नियम रोजगार हमी योजनेच्या कायद्याच्या कलम 33 नुसार बनवण्यात आलेले आहेत. VB-G RAMG कायद्याला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी ते नियम सार्वजनिक करण्यात आलेले आहेत.  व्हीबी-जी राम जी या कायद्याच्या नवीन नियमावलीला जर काही हरकती सूचना असतील तर त्या हा मसुदा प्रकाशित केल्याच्या 30 दिवसाच्या आत मंत्रालयाला कळवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना आपल्या हरकती सूचना पाठवण्यासाठी श्री दीपक कुमार अव्वर सचिव ग्रामीण विकास विभाग, दुसरा मजला, कर्तव्य भवन 3, नवी दिल्ली...

नुकसान ग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई साठी राज्यात लवकरच ई पंचनामा | ativrushti epanchnama Maharashtra

इमेज
नुकसान ग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई साठी राज्यात लवकरच ई पंचनामा  ativrushti epanchnama Maharashtra  नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या नुकसान ग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई साठी राज्यात लवकरच मोबाईल एप्लिकेशन्स द्वारे ई पंचनामा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू ,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे अनेकदा होत नाहीत. मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून ई – पंचनामा करण्याचा प्रयत्न असेल. आधार लिंक खात्यावर पैसे जमा करणार आहोत. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापरही येत्या काळात करण्यात येईल. नव्याने आपत्ती निवारण क्षेत्राचे मॅपिंग करण्यात येवून पुनर्वसनाचे नवीन धोरण तयार करण्यात येईल. बोगस बियाण्यांचा प्रकार रोखण्यासाठी बियाण्यांचे पॅकिंग घेतल्यानंतर ट्रॅक अँड ट्रेस चा अवलंब करण्यात येईल. बोगस बियाण्यांच्या विक्रीस यामुळे प्रतिबंध लागेल. जैविक शेती आणि नैसर्गिक शेती यासंदर्भात काही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न...

कृषी विभागाच्या पुरस्काराचे 1 जुलैला वितरण || Krishi Awards Maharashtra

इमेज
कृषी विभागाच्या पुरस्कारांचे 1 जुलैला वितरण. Krishi Awards Maharashtra  राज्यात शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण आणि उद्यान पंडित यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे. सन २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे करण्यात येणार असून, या सोहळ्यास महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री.जिष्णु देव वर्मा यांना प्रमुख उपस्थितीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, नाविन्यपुर्ण कल्पना आणि कृषी विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार, दि.१ जु...